Search This Blog

Friday, 23 March 2018

(हृदय)विकार विचारांचे


(हृदय)विकार विचारांचे 



माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. माध्यमामध्ये समाजाचा जसाच्या तसा चेहरा दिसतो. मात्र या दोन घटनेचे माध्यमांमधून जे चित्रण केले गेले यामुळे या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे दिसत आहे. दिनांक २५ पेâब्रुवारी रोजी सकाळी व्हॉट्सअपवर बातमी आली, भारतीय सिनेतारका श्रीदेवी ५४) हिचे दुबई येथेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवसभर श्रीदेवीच्या निधनाची बातमी प्रत्येक माध्य्ूामांवर दाखविण्यात येत होती. श्रीदेवीचे पुर्वायुष्य दाखविण्यात येत होते. श्रीदेवीने काम केलेल्या वेगवेगळया चित्रपटातील भुमिकेची तारीफ केली. श्रीदेवीला श्रध्दांजली म्हणून चित्रपटात तिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांची मालिका दाखविण्यात आली. एवढी सौदर्यसंपन्न सिनेतारकाअचानक आपल्यातून निघून गेल्याबद्दल तिच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. श्रीदेवीचे पार्थिव दुस-या दिवशीमुंबईत आणणार याची बातमी कळताच तिचे चाहते अंत्यदर्शनासाठी मुंबईत मोठया संख्येने हजर झाले. कलाकारांना आपल्या चेह-याची व शरीराची ओळख कायम आवश्यक असते. याकरीता ते प्लॅस्टिकसर्जरी, डाएट, स्टेरॉइड्स वगैरेंचा कमी अधिक प्रमाणात वापर करतात. श्रीदेवीने देखील आपले सौदर्य जपण्यासाठी यातीलकाही गोष्टींचा वापर केला होता. याचा विपरीत परिणाम होऊन श्रीदेवी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, याबाबत वेगवेगळया माध्यमांतून तज्ञांसोबत चर्चा घडविण्यात आल्या. शेवटी यासर्वांचा परिणाम म्हणून व श्रीदेवी मानसिक तणावाखाली वावरत असल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला यावर माध्यमांनी शिक्कामोर्तब केले. दिनांक २६ पेâब्र ुवारी रोजी माध्यमांवर बातमी आली श्रीदेवीचा मृत्यु बाथटब मध्ये पडून झाला. त्यावेळी त्यांनीमदयपान केले असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे पती बोनी कपूर हे देखिल त्यांचे सोबत असल्याचे सांगितले. श्रीदेवीच्या मृत्युचीपुर्ण चैकशी झाल्याशिवाय पार्थिव मुंबईला घेऊन जाण्याची परवानगी दुबई पोलीसांनी नाकारली होती. पुन्हा एकदा माध्यमांवरश्रीदेवी यांच्या मृत्युच्या कारणांबाबतच्या चर्चेला उधाण आले. निरनिराळे तर्वâ वितर्वâ मांडले जाऊ लागले. चर्चा घडवून आणल्यागेल्या. अखेरीस दिनांक २७पेâब्र ुवारीला श्रीदेवीचे पार्थिव मु ंबईला आले व दुस/या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक २७ पेâब्रुवारीला वरळी, मुंबई येथील इयत्ता दहावीत शिकणारा व बालपणीच वडीलांचे छत्र हरविलेलाहरहुन्नरी मुलगा ऋतिक घडशी १५) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची बातमी आली. दुसNया दिवशी त्याचा दहावीचा पहिला पेपर होता. आदल्या दिवशी होळीची थोडीशी दंगामस्ती केल्यावर रात्री जेवून झोपी गेलेल्या ऋतिकला दिडच्यासुमारास निद्रिस्त अवस्थेत काहीतरी त्रास होऊ लागला आणि त्याला केईएम रुग्णालयात घेवुन जाईपर्य ंत त्याची प्राणज्योत मावळली. आई आणि दोघी बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला. ऋतिक हुशार असुन त्याला अभ्यासाचा कोणताच तणाव नव्हता असे त्याच्या पालकांनी व शिक्षकांनी सांगितले. त्याचेवर कावीळीचा उपचार चालु होता. तरी देखील माध्यमांनी ऑऑअभ्यासाच्या तणावामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने ऋतिकचे निधनवळवळ अशी बातमी दाखवून दिली. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटना कोणतीही शहानिशा न करता हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचेसांगण्यात आले. यासाठी मानसिक तणाव हे एकच कारण पुढे करण्यात आले. टीआरपी वाढविण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहण्यास मिळाली. माध्यमं ही समाजाचा आरसा आहेत. कोणतीही घटना जशी घडली त्याप्रमाणे लोकांपर्य ंत पोहचविण्याचे काम माध्यमांचे आहे. परंतु या ठिकाणी आपले विचार दुसNयाच्या गळी उतरविण्याची स्पर्धा लागली. आपण जेसांगतो, जे दाखवतो ते लोकांना खरे वाटावे याकरीता भाग पाडले जात आहे. आपण मांडलेल्या मतांचा दुस/याच्या मनावर(हृदयावर) काय परिणाम होत असेल, याचा थोडा देखील विचार केला गेला नाही. विचारांचे विकार जडून लोकांत संभ््राम निर्माण करण्यात येत आहे. समाजात आपल्या विचारांना किती मोलाचे स्थान आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकेकाळी वयोवृध्द व श्रीमंतांचा आजार असणारा ऑहृदयविकारवळ हळुहळु तरुणाई पार करुन बालकांकडे वळू लागला आहे. परंतु हृदयविकाराचे खरे कारण काय ? का घडून येतो हृदयविकार ? हृदयविकाराचा झटका येण्याचे मानसिक तणाव हे एकच कारण असु शकते का ? आजच्या स्पर्धात्मक जगात कित्येकांना मानसिक तणावातुन जावे लागत आहे. याची कारणेकाय असतील ? यावर उपाय काय ? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिली आहेत.

शब्दांकन: श्री.अजित केसरकर 

No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...