सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है...
शहीद भगतसिंग,ज्यांना २३ मार्च १९२१ ला वयवर्ष (२३ वर्ष पाच महिने व २३ दिवस) असताना ब्रिटिशांकडून सुखदेव व राजगुरू यांच्या समवेत फाशी देण्यात आली.जर भगतसिंगांना आपला जीव वाचवायचा असता तर ते इंग्रजांची माफी मागून आपला जीव वाचवू शकले असते परंतु भगतला मातृभूमी सोडून कोणासमोर झुकने माहीतच नव्हते!"जीवन हे आपल्या हिंमतीवर जगले जाते,दुसऱ्याच्या खांद्यावर तर प्रेत उचलले जाते" ही त्यांची विचारधारा होती!
भगतसिंग यांचे विचार हे गांधींच्या विचारांच्या विरुद्ध होते. आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपल्याला "ईट का जबाब पत्थर से देना होगा" ही त्यांची मान्यता होती!त्यांच्या जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पाकिस्तान येथील बंगा ह्या गावात झाला!
त्यांच्या जन्म झाला त्याच दिवशी त्यांचे वडील सरदार किशनसिंग व काका अजितसिंग यांची जेल मधून सुटका करण्यात आली,इंग्रजांच्या विरुद्ध बंड केल्याने त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले होते!देशप्रेमाचा बाळकडू त्यांना अश्याप्रकारे जन्मपासूनच घरातूनच मिळाला होता!त्यांना इंग्रजांप्रती इतका राग होता की ते इतर शिखांप्रमाणे लाहोरच्या ब्रिटिश शाळेत न जाता त्यांनी दयानंद वैदिक हायस्कूल मध्ये जाऊन शिक्षण घेतले.१९१९ मध्ये जेव्हा ते केवळ १२ वर्षाचे होते तेव्हा जालियनवाला बागेत हजारो निष्पाप लोकांनां मारण्यात आले,भगतसिंग यांच्या मनाला ही गोष्ट लागली व त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासून बंदूक हातात घेतली व देशासाठी इंग्रजांना मारण्यास सुरवात केली.
त्यांचा गांधींच्या अहिंसा धोरणाला कायम विरोध होता, त्यांच्यामते केवळ अहिंसा धोरण अवलंबल्यामुळे चौरीचौरा मध्ये निष्पाप लोक मारले गेले होते.जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते शाळेत शिकत होते,त्यांना जेव्हा ही घटना कळली तेव्हा ते ५० किलोमीटर चालून घटनास्थळी पोहचले,तेथील भयाण दृश्य पाहून भगतसिंगांना अपार वेदना झाल्या!त्यांनी तेथील रक्तात माखलेली माती घरी आणली व इंग्रजांकडून बदला घेण्याचे ठरवले!त्यानंतर त्यांनी युवकांना एकत्र केले व त्यांना "ईट जबाब पत्थर" हे तत्व शिकवले.
इंग्रज कामगारांच्या विरोधात एक बिल पास करणार होते,जे कामगारांच्या हिताचे नव्हते.चंद्रशेखर आझाद व भगतसिंगना ते मंजूर नव्हते.ह्याचा विरोध म्हणून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी ०८ एप्रिल १९२९ दिल्लीत सेंट्रल असेंबलीत बॉम्ब फेकला,बॉम्ब फेकण्याचा उद्देश कुणाचा जीव घेणे हा नव्हताच,केवळ बहिरेपणाचे ढोंग करणाऱ्या इंग्रजांना घाबरवणे हाच मूळ उद्देश होता,त्यासाठी बॉम्ब बनवताना त्यात अत्यल्प स्फोटक वापरण्यात आली होते.बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी स्वेच्छेने अटक करून घेतली,जेणेकरून हे बातमी देशभरात वणव्यासारखी पसरेल व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत होईल!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या भगतसिंग व त्यांच्या साथीदारांना २३ मार्च १९३१ रोजी ७ वाजून ३३ मिनिटांनी फाशी देण्यात आली,अन ह्या पंजाबच्या वाघाने वयाच्या २३ व्या वर्षी हसत हसत फाशी जाणे पसंद केले. त्यादिवसापासून "भगतसिंग" "शहीद भगतसिंग झाले".
त्यांच्या ह्या बलिदानातून एक गोष्ट सिद्ध होते....
"व्यक्ती ला मारून तुम्ही त्यांचे विचार दडपू शकत नाही".
अश्या ह्या अवलिया अन प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मनाचा मुजरा!
त्यांनी लिहलेल्या दोन ओळी खाली देत आहे ...........
.
.
.
मेरे सीने में जो जख्म है वो सब फूलो के गुच्छे है
हमें तो पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे है!
.
.
.
इनकलाब झिंदाबाद !
संदर्भ: शहीद भगतसिंग
शब्दांकन : वीरेन्द्रसिंह उत्पात