Search This Blog

Friday, 23 March 2018

मला भेटलेली माणसं...


मला भेटलेली माणसं...


काही माणसं कशी असतात ना? क्षणोक्षणी रंग बदलत असतात. सतत त्यांचा वाईटपणा चांगुलपणाच्या आड येत असतो. का कोणास ठाऊक पण कधी ती इतकी चांगली वागतात की आपण त्यांच्याशी आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्यांना मनमोकळेपणाने सांगतो. पण नंतर आपल्या लक्षात येतं की आपण चुकिच्या व्यक्तीशी हितगुज साधतोय.
खरचं प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात किती फरक असतो ना? वेगवेगळी माणसं भेटतात. त्यांच्यात संवाद होतो. मैत्री होते. भेटीगाठी वाढतात. मग मतभेद होतात. त्यानंतर वाद होतोत. काहीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं ही शेवटपर्यंत आपली साथ देतात. निर्मळ, निस्वार्थ, प्रेमळ नाती फक्त तीच टिकवू शकतात मग ते मैत्रीचं नातं असो, प्रेमाचं असो, नवरा बायकोचं असो नाहीतर इतर कोणतंही नातं असो. अर्थात त्यासाठी एकमेकांचे स्वभाव जुळणे महत्त्वाचे. तेव्हाच मत जुळतात. थोडेफार मतभेद चालायचेचं. कारण कोणत्याही व्यक्तीच्या राहण्यात, वावरण्यात, खाण्यापिण्यात भिन्नता आढळणारचं. आणि मनं किती जरी जुळली तरी  थोडाफार विचारांमध्ये फरकं असणारच नां?
मजेदार गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने आपण स्वत: बरोबर आहोत असे सर्वांना वाटत असते. पण काही लोक प्रामाणिकपणे आपल्या चुका मान्य करतात तर काही लोक आपण चुकतोय हे माहित असूनदेखील दुस-यांच्या चुका दाखवून देऊन स्वत:ची चुक पडद्याआड करतात.
काही लोकांमध्ये साम्य असतं कारण त्यांच्या काही सवयी, आवडीनिवडी, माणसांना परखण्याची  खासियत असते. ते स्वत:च मान्य करतात की आपण एकमेकांसारखेच आहोत. पण त्यांच्यात साम्य अजिबात नसतं. हि माणसाची वृत्ती असते. तो कधी स्वार्थी-निस्वार्थी, विश्वासघातकी- विश्वासू, प्रेमळ- रागीट होईल सांगू शकत नाही.
मला इतकंच वाटतयं की माणसाने मीपणा, अहमपणा सोडला की सगळं नीट होईल. आपोआपचं दुस-यांच सुख-दुख: आपलं मानून स्वत:च्या चुकांची कबूली देण्यात जे मोठेपणं आहे ते दुसरं कशातचं नाही.

शब्दांकन: अमृता घुमरे-कारेकर 
    

No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...