Search This Blog

Friday, 23 March 2018

मुंबई....

मुंबई...



     नुकतचं  मुंबई दिनांक हे अरुण साधूं नी लिहिलेलं पुस्तक वाचलं. राजकारणाच्या किती विविध छटा असतात आणि त्यामधे किती वेगवेगळ्या पातळीवर अनेक लोकं गुंतलेले असतात हे संगणारी ही कथा.मुंबईमधे घड़नारी ही कथा मुंबईच्या अनेक वेगवेगळ्या रूपाचे सुद्धा दर्शन घडवते. मुंबईला स्वप्ननगरी का म्हणतात ते ही कुठेतरी प्रत्ययाला येतं. मुंबईत आपलं नशिब आजमवायला रोज अनेक लोकं येतात. फुटपाथवार झोपुन दिवस काढतात. आणि एक दिवस मोठ्या बंगल्याचे मालकही होतात. पहिल्यांदा मुंबईत आल्यावर ही मुंबई एकदम आंगावर आल्यासारखी वाटते. धावाणारे लोकं, पायाला चाक लावून सतत इकडून तिकडे पळतायेत. का? कशासाठी? याची उत्तर ज्याची त्यांनी शोधायची. चार दिवस मुंबई फिरायला येणाऱ्यांना हे शहर खुप वेगळ वाटतं. खुप ग्लैमरस, हवहवसं ,एकदम भन्नाट! वाटतं इथेच येऊन राहाव, इथल्या जगाचा आपणही भाग व्हाव. आणि एक दिवस खरच आपल्यावर तशी वेळ येते. आपण आपला बोरा-बिस्तरा उचलून मुंबई गठतो. मनात अनेक स्वप्न, अनेक आशा घेऊन !आपल्यालाही वाटतं की आपण एक दिवस या मुंबईचा भाग होउ. आपल्याही नकळत आपण या शहराचा भाग बनूनहि जातो. इथल्या गर्दीत मिसळून जातो. एक चक्र आपल्याही पायाला लागतं.
                    फार विचित्र वाटतं हे शहर कधी कधी. खुप चीड़ येते इथल्या गर्दीची, सतत घामेजुन  टाकणाऱ्या वातावरणाची, कायम धावायला लावणाऱ्या परिस्थितिची, स्वतलाही विसरायला लावणाऱ्या धडपडीची. पण... त्याच वेळी आपण प्रेमातही पडतो या मुंबईच्या. समुद्र किणाऱ्यावर येऊन बसल की जाणवतं या शाहराच सौंदर्य. असंख्य लाटा किणाऱ्यावर येऊन धडकतात तसे असंख्य लोक मुंबईत येतात आणि इथलेच होऊन जातात. मग याच गर्दीची सवय व्हायला लागते. धावता धावता स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी आपल्यात निर्माण होते. अनेक अनोळखी चेहरे मग आपलेसे वाटू लागतात. घडयाळाच्या काट्यावर चालायला , वेळेच गणित जमवायला, वेळ पाळायला हे शहर आपल्याला शिकवतं. धो धो कोसळत राहणारा पाऊस, पावसात अड़कल्यावर एकमेकांना मदत करणारे अनेक हात, लोकललाच आपलं दूसरं घर माननारे, त्या लोकलच्या धावत्या  चाकावर सण-उत्सव साजरे करणारे मुंबईकर. आपल्याला आपल्याच आयुष्यचा एक भाग वाटू लागतात. आणि आपणही होउंन जातो एक मुंबईकर.

शब्दांकन: अतुल चव्हाण 

No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...